Agriculture News: ज्या गोष्टीची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस म्हणजे पाऊस येण्याचा दिवस आला आहे. आजपासून महाराष्ट्रात परत एकदा सर्वत्र पावसाचे वातावरण होऊन सगळीकडे पाऊस पडत आहे.
पंजाबराव डख Panjab dakh यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे आज पासून भरपूर पाऊस पडायला सुरवात झालेली आहे.
बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा तयार होणार होता तो थोडा उशिरा झाला त्यामुळे थोडा लेट का होईना पण थेट पावसाला सुरवात झालेली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बहिताशी ठिकाणी पाऊस झड लावल्यासारखा मध्यम ते हलका स्वरूपात पडणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वत्र शेतकरी बांधवाना पावसाची खूप प्रतीक्षा होती कारण पूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला होता, आता शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे.
तसे तर आजपासूनच पावसाने सगळीकडे दमदार एंट्री केली आहे पण उद्या व परवा यामध्ये अजून वाढ होऊन खालील भागामध्ये आणखीही पुसा पडण्याची शक्यता आहे.
विदर्भतील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला तसेच पूर्व व पश्चिम पूर्ण विदर्भात हा पाऊस असणार आहे.
मराठवाड्यातील लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी, नांदेड याभागात पण चांगला पाऊस पडणार आहे.
तसेच सोलापूर व पश्चिम महाराष्ट्र मध्ये पण पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकण भागामध्ये पूर्ण कोकण पट्टी पण चांगला पाऊस असणार आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी पण पाऊस पडणार आहे.
तसेच मुंबई मध्ये पण पाऊस पडून उकाडा कमी होणार आहे.
तसेच ऑक्टोबर महिन्यात कसा पाऊस असेल याबाबत अद्याप अंदाज आलेला नाही आहे.
तरी शेतकरी बांधवानी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.